पहिल्याच महासभेत आयुक्त आदित्य जिवने यांचा स्पष्ट इशारा; “कठोर निर्णयांना राजकीय आडकाठी नको!”
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदित्य जिवने यांनी पहिल्याच महासभेत शहराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडत, जनहितासाठी घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांमध्ये कोणतीही राजकीय आडकाठी येऊ नये, असा स्पष्ट संदेश दिला. “मी आयएएस आहे म्हणजे माझ्याकडे जादूची छडी नाही. शहराचा विकास हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातूनच शक्य आहे. मात्र कठोर निर्णय घेण्याची वेळ आली,…