Home » जळगाव » अमळनेर » कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात : पती-पत्नी ठार

कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात : पती-पत्नी ठार

जळगाव : प्रतिनिधी

मुंबई ते नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. मयतात दोघे अमळनेरचे आहेत. तर मुलगी जखमी झाली आहे. तर त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नाशिक महामार्गावरील शहापूर येथील पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स या खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत तत्काळ मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. यात पीयूष पाटील (वय ३३) आणि वृंदा पीयूष पाटील (वय ३०) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे. पीयूष पाटील हे मुंबईतील बीएमसीत नोकरीला होते, तर वृंदा पाटील या बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *