जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी येथे आई कामाला व भाऊ शिकवणीसाठी गेलेला असताना जयश्री लक्ष्मण चव्हाण (१५) या मुलीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री चव्हाण ही मुलगी आई व भाऊ यांच्यासोबत राहत होती. २ सप्टेंबर रोजी तिची आई कामावर गेलेली होती तर लहान भाऊ शिकवणीला गेलेला होता. संध्याकाळी जयश्रीने पाय दुखत असल्याने स्वतः साठी गोळ्या आणल्या. त्यानंतर तिने घरात गळफास घेतला. तिचे आजोबा घराकडे गेले, त्यावेळी गळफास घेतल्याचे दिसले. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
