चार हजार वारकऱ्यांना विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले –”वारी हीच माझी सर्वात मोठी पुण्याई”
पाळधी / जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडले. यावेळी बोलताना पालकमंत्री…