घरकुलांच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जुलैत विशेष मोहीम; लाभार्थ्यांना पुढे येण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-१ व टप्पा-२) अंतर्गत अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जुलै महिन्यात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर झालेली अतिक्रमणे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटवून लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर…