मन्यारखेडा मासे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; १६ उद्योजकांची निष्पक्ष चौकशीची मागणी
जळगाव | प्रतिनिधी : मन्यारखेडा येथील तलावातील मासे मृत्यू प्रकरणात प्रशासनाकडून उद्योगांवर एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत परिसरातील उद्योजकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निष्पक्ष व वैज्ञानिक चौकशीची मागणी केली. कोणत्याही ठोस निष्कर्षापूर्वी उद्योगांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य उत्पादकाच्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने उद्योजक आणि उद्योगांवर अवलंबून असलेल्या…