तुटलेल्या नाल्यांच्या कठड्यांवर तात्काळ कारवाई!; उपमहापौरांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले कठडे आणि अनेक ठिकाणी संरक्षक रेलिंग नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरातील…